कळंबस्थानिक बातम्या

सुनील मार्केटमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व्यापाऱ्यांची कसरत

कळंब (प्रतिनिधी): नगर परिषदेच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे सुनील मार्केटमधील व्यापाऱ्यांना स्वतःचे पैसे खर्च करून जमा झालेले पाणी बाहेर काढावे लागले. व्यापारी वर्गाने प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र रोष व्यक्त केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही निष्क्रियता

अवघ्या काही महिन्यांवर निवडणुका येऊन ठेपल्या असताना ना माजी नगरसेवक, ना भावी उमेदवारांनी व्यापाऱ्यांची विचारपूस केली किंवा मार्केटची पाहणी केली. या निष्क्रियतेमुळे व्यापाऱ्यांचा संताप आणखी वाढला आहे.

दरवर्षीची पावसाळी समस्या

दरवर्षी पावसाळ्यात सुनील मार्केटमध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ठोस उपाययोजना प्रशासनाने अद्याप केलेल्या नाहीत. त्यामुळे दरवेळी व्यापाऱ्यांनाच यातून मार्ग काढावा लागतो.

आंदोलनाची शक्यता

आता व्यापाऱ्यांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे – कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागणार का? प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सुनील मार्केटसाठी जलनिस्सारणाची पक्की व्यवस्था करावी, अशी मागणी व्यापारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!